*****मध्य रेल्वेचे पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष.*****
१. पुणे - सोलापूर - कोल्हापूर हा त्रिकोण विकसित करणे गरजेचे.
२. मार्गावरील कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, सातारा, कराड, कोल्हापूर या महत्वाच्या स्टेशनवर पुरेशा सुविधा उपलब्ध कराव्यात.
३. सोलापूर-कोल्हापूर आणि कोल्हापूर-पुणे मार्गावर नव्या सुपरफास्थ इंटरसीटी चालू कराव्यात.
४....
more... मिरज-मुंबई एक्स्प्रेस वाया पंढरपूर नवी गाडी चालू करावी (आठवड्यातून तीन दिवस).
५. सोलापूर-वास्को वाया मिरज नवी गाडी चालू करावी (आठवड्यातून तीन दिवस).
६. सध्या सोलापूर - मिरज मार्गावर दिवसातून फक्त एकच गाडी आहे, जादा गाड्यांची व्यवस्था करावी.
७. सोलापूर-जयपूर गाडी शिर्डी मार्गे न सोडता ती पंढरपूर, मिरज, कल्याण, वसई रोड मार्गे सोडावी.
८. बागलकोट-म्हैसूर बसव एक्स्प्रेस मिरज-म्हैसूर वाया सोलापूर, वाडी, गुंतकल अशी सोडावी.
९. कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस गाडी सोलापूर मार्गे सोडावी.
१०. कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस वाया लातूर दररोज करावी आणि गाडीचे अनावश्यक थांबे कडून गती वाढवावी.
११. मुंबई-पंढरपूर गाडी पुढे पंढरपूर-मिरज म्हणून सोडावी.
१२. पंढरपूर-मिरज मार्गावरील गाड्या हुबळी-बेळगाव गाड्यांशी न जोडता त्या सातारा-कोल्हापूर गाड्यांशी जोडाव्यात.
१३. मुंबई-पुणे इंटरसिटी सोलापूर पर्यंत विनाथांबा वाढवावी.
१४. मुंबई-पुणे इंद्रयानी एक्स्प्रेस पंढरपूर पर्यंत वाढवावी.
१५. पुणे-सोलापूर इंटरसिटी सकाळी सात वाजता सोडून वाडी पर्यंत वाढवावी.