Personal comments will be immediately deleted by our Admins. Admins are NOT obligated to explain their actions. Please respect our Admins' decisions. They are instrumental in maintaining the quality of this forum.
If you do not agree with the above, then please DO NOT POST. Thanks.
रत्नागिरी मान्सूनच्या आगमनाचा पहिलाच फटका कोकण रेल्वेला बसला. रविवारी रत्नागिरीजवळ अडवली रेल्वे स्थानकानजीक रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे पाच तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. आज, सोमवारी सकाळी साडेसात वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. अडवली रेल्वे स्थानक परिसरात रविवारी मुसळधार पाऊस पडला. यामुळे रेल्वे ट्रॅकवर पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळली. परिणामी एर्नाकुलम -पुणे एक्सप्रेस रत्नागिरीत थांबविण्यात आली होती. तर गरीब रथ एक्स्प्रेस सावर्डे स्टेशनवर , मंगलोर एक्स्प्रेस खेड स्टेशनवर , राज्य राणी एक्सप्रेस वीर स्टेशनवर आणि कोकणकन्या एक्सप्रेस माणगाव स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या. आज, सोमवारी सकाळी साडेसात वाजता दरड हटविण्यात आली असून दोन्ही मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरु असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.