Personal comments will be immediately deleted by our Admins. Admins are NOT obligated to explain their actions. Please respect our Admins' decisions. They are instrumental in maintaining the quality of this forum.
If you do not agree with the above, then please DO NOT POST. Thanks.
मुंबई उपनगरी लोकल सेवा सुरळीत चालण्याबरोबरीने लांब पल्ल्यांच्या गाड्यांची व्यवस्था योग्य प्रकारे राखण्याचे आव्हान रेल्वेसमोर नेहमी असते. पश्चिम , मध्य आणि हार्बर रेल्वेवर दररोज शेकडो लोकलच्या फेऱ्या होत असतात. तीच गत सीएसटी , लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) , वांद्रे टर्मिनस , दादर अशा काही टर्मिनसमधून शेकडो एक्स्प्रेस ये-जा करत असतात. मात्र , या टर्मिनसमध्ये सुविधांपेक्षा गैरसोयच जास्त आहेत आणि त्याचा नमुना म्हणजे कुर्ला टर्मिनस. सीएसटी , दादर या टर्मिनसमधून मेल-एक्स्प्रेस सेवेवर अतिरिक्त ताण पडू लागल्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेवर स्वतंत्र टर्मिनसची व्यवस्था करणे भाग ठरले. त्यातून , पिश्चम मार्गावर वांद्रे टर्मिनस आणि मध्य रेल्वेवर कुर्ला टर्मिनसची जागा निवडण्यात आली. सर्व मार्गावरील प्रवाशांना सीएसटी , दादर गाठण्यापेक्षा ही दोन टर्मिनस गाठणे फायदेशीर ठरेल , अशी भूमिका त्यावेळी मांडण्यात आली. प्रत्यक्षात , ही दोन्ही टर्मिनस म्हणजे प्रवाशांसाठी गैरसोयीचे आगार बनले आहे. ... Read more...
कुर्ला टर्मिनसवरून कोकणापासून ते इतर राज्यातील गाड्या सुटत असतात. कुर्ला टर्मिनस गाठणे म्हणजे महत्प्रयासाचे ठरते. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील कोणत्याही ठिकाणाहून कुर्ला टर्मिनस गाठणे कठीण आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांकडून होणारी लूट , फेरीवाल्यांचा गराडा आणि समाजकंटकांचाच येथे वावर आढळतो. रिक्षा-टॅक्सीचालकांच्यादृष्टीने हे टर्मिनस म्हणजे प्रवाशांना लुटीचे ' परमीट ' ठरले आहे. कुर्ला स्टेशनवरून निघणाऱ्या रिक्षांमध्ये मीटर नसते. रिक्षाचालक जी रक्कम सांगतील ती देण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नसतो. या ठिकाणी वाहतूक पोलिसांशी असलेल्या ' सहकार्या ' च्या धोरणामुळे रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाई केली जात नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. रात्रीच्या सुमारास त्यांची मुजोरी जास्तच वाढते. फेरीवाल्यांचा वेढा... साबळेनगर ते टर्मिनस रोडवर दोन्ही बाजूला फेरीवाल्यांचा वेढा पडलेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्याबरोबरीने जादा रक्कम आकारून पदार्थांची विक्री केली जात असल्याचे अनेक तक्रारी आहेत. मात्र , त्याकडे रेल्वे प्रशासन , पोलिस , पालिका या साऱ्या यंत्रणा दुर्लक्ष करतात. सुरक्षा वाढवली पाहिजे... रेल्वे स्टेशनवरही फारशी सुरक्षा नसल्याने ऐवज चोरीस जाण्याची भीती कायम असते. कुर्ला टर्मिनसमध्ये उशीर झाल्यास भीतीचे वातावरण असते. या ठिकाणी रेल्वे पोलिस वा आरपीएफच्या जवानांनी जास्त गस्त घालणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने लागलीच पावले उचलावीत.