शिर्डी-मनमाड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील शिर्डी-पुणतांबा-मनमाड या ८0 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, उद्या (बुधवारी) मुख्य संरक्षा आयुक्त चेतन बक्षी हे पाहणी करून अहवाल देणार आहेत. त्यानंतरच विद्युतीकरण झालेल्या मार्गावर वेगाने गाड्या धावणार आहेत.
विद्युतीकरण झालेल्या रेल्वे मार्गांवर काही त्रुटी असतील तर त्याबाबत चेतन बक्षी यांनी जे सुचवतील त्यानुसार त्यात बदलही करण्यात येईल. जर त्रुटी आढळल्या नाहीत तर एक-दोन दिवसांमध्ये गाड्या धावण्यास काहीच अडचण येणार नाही. विद्युतीकरणामुळे शिर्डीला येणार्या लांब पल्ल्याच्या गाड्या वेगाने धावणार असून, त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. शिवाय रेल्वेचे इंधन बचत होणार आहे....
more... अडीचशे कोटींचा हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे वरिष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक सुशील गायकवाड यांनी सांगितले. मनमाड-दौंड या २१३ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणही युद्धपातळीवर सुरू असून, एकूणच डिसेंबर २0१५ पर्यंत संपूर्ण विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी) दौंड-वाडीसाठी निविदांची प्रक्रिया ■ मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड ते वाडी या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले सर्वच गाड्या विनाइंधन धावणार आहेत. दौंड ते वाडी या मार्गाच्या विद्युतीकरणासाठी निविदांची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतरच कामाला गती येणार आहे.