New train between nanded mumbai soon
औरंगाबाद : औरंगाबादहून मुंबईकडे जाण्यासाठी देवगिरी एक्स्प्रेसनंतर एकही रेल्वे नव्हती. त्यामुळे नांदेड - मुंबई मार्गावर नवी रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. ही २२ डब्यांची रेल्वे सकाळी दहा वाजता सीएसटीएमला पोचेल अशा पद्धतीने नियोजन केले आहे.
औरंगाबादहून मुंबईला ‘देवगिरी’, ‘नंदीग्राम’ आणि ‘तपोवन’ या तीन एक्स्प्रेस रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. ‘जनशताब्दी’लाही गर्दी असते. या रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने मुंबईला जाण्यासाठी रेल्वे वाढविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन रेल्वे विभागाने नांदेड - मुंबई अशी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेची घोषणा...
more... रेल्वेमंत्री सुरेश प्रभू परळी येथील कार्यक्रमात करणार होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे तेथेया रेल्वेची घोषणा केली नाही. नांदेड - मुंबई रेल्वे सुरू करण्याची निर्णय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नांदेड येथे मुंबईसाठी फलाट निश्चितीनंतर; तसेच सकाळी नांदेड मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेंच्या वेळांच्या नियोजननंतर रेल्वे सुरू होणार आहे. त्याला महिनाभराचा कालावधी लागेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.