प्रदीर्घ
पाठपुराव्यानंतर सुरु
झालेल्या लातूर-मुंबई
रेल्वेला नांदेडपर्यंत
नेण्याचा डाव रचण्यात
आला...
more... आहे. ही रेल्वे
लातुरहूनच
सुटावी या मागणीसाठी खा.
जर्नादन वाघमारे
यांच्या नेतृत्वात लातूरचे
शिष्टमंडळ
दिल्लीला रेल्वेमंत्र्यांना साकडे
घालणार आहे.
त्याचबरोबर लातूर-पुणे
इंटरसिटी सुरु
करण्याची मागणी करण्याचा ठराव
रविवारी झालेल्या बैठकीत
घेण्यात आला. पश्चिम
रेल्वे बोर्डाचे सदस्य
विजयकुमार बोडके
यांच्या अध्यक्षतेखाली लातूर
रेल्वे स्थानकात बैठक
झाली. यावेळी विविध
प्रश्नावर
उपस्थितांनी मत मांडले.
याप्रसंगी बोडके म्हणाले.
लातूर-मुंबई ही रेल्वे
लातूर येथे कायम ठेवावी.
यासाठी खा. जनार्दन
वाघमारे
यांच्या नेतृत्वात
दिल्ली येथे
रेल्वेमंत्र्यांना भेटून
साकडे घालण्यात येणार
आहे. ही रेल्वे
नांदेडला सोडल्यावर
त्यांचा फ़ायदा होण्याऐवजी तोटाच
होईल, यातून
लातूरच्या प्रवाशांची कुचंबना होईल.
नांदेडपर्यंतचा प्रवास
खुप वेळखाऊ असल्याने
रेल्वेमंत्र्यांना पटवून
देण्याचा प्रयत्न
करण्यात येईल.
लातूरकरांनी पक्षीय
मतभेद बाजूला सारुन
एकत्र यावे, असे आवाहन
हरिभाऊ जवळगे
यांनी केले