रेल्वेच्या तिकिट घरात जातान
छताच्या पीओपीचे काम सहा महिन्यांपासून थंडबस्त्यात : प्रवाशांच्या जीवितास धोका
वर्धा : स्थनिक रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सोयीकरीता सुसज्ज तिकिट घराची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, गत काही दिवसांतच...
more... तिकिटघराची वाट लागल्याचे दिसून येत आहे. छताची तोडफोड करण्यात आली आहे. छताच्या पीओपीचे काम गत सहा महिन्यांपासून थंडबस्त्यात असल्याचे प्रवासी बोलत आहे. जिथे काम सुरू आहे. त्याच परिसरात प्रवासी उभे राहतात. वेळप्रसंगी पीओपीचा एखादी पोपडा पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे प्रवाशांकरिता पिण्याच्या पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही. तर प्रवेशद्वारावरील गट्टूसुद्धा निघाले आहे.
येथील मुख्य रेल्वे स्थानकावर पूर्वी जुने तिकीटघर होते, परंतु ती जागा अपुरी पडत होती. त्यामुळे ते तिकीटघर पाडण्यात आले. त्याच परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज असे भव्य तिकीट घराची निर्मिती करण्यात आली. परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. तिथे प्रवाशांना थंड पाण्याची व्यवस्था व्हावी, याकरिता वॉटर फिल्टर मशिनसुद्धा काही दिवस होती. तर प्रवाशांना बसण्याकरिता बेंचेस फॅनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली.
मात्र, काही दिवसांतच छताच्या पीओपीची तोडफोड करण्यात आली. आणि पीओपीचे नव्याने काम करण्या सुरूवात केली. मात्र, गत पाच ते सहा महिन्यांच कालावधी लोटूनही पीओपीचे काम पूर्ण झाले नाही. जिथे पीओपीचे काम सुरू होते. तिथे काही दिवस बेंचसुद्धा ठेवले होते. आजही लगतच काही बेंच आहे. त्या बेंचवर प्रवासी बसतात. वेळप्रसंगी पीओपीचा एकखादी तुकडा पडल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथील शौचालयाचीसुद्धा नियमित स्वच्छता होत नसल्याचे प्रवासीच बोलत आहेत. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
सर्वात सुखकर आणि आरामदायी प्रवास म्हणून हजारो नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे येथील तिकीट घरात नागरिकांची वर्दळ असते. वेळप्रसंगी तिकीट काढण्याकरीता प्रवाशांच्या लांबच लांब रांगा असतात. मात्र, येथील छताच्या पीओपीचे काम थंडबस्त्या असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देत येथील पीओपीचे काम तत्काळ पूर्ण करावे, येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे म्हणणे आहे.
परिसरातील गट्टूही उखडले
स्थानिक रेल्वे स्थानकावर नवनिर्मित सुसज्ज तिकीट घराची निर्मिती करण्यात आल्यानंतर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यानंतर तिकीट घराच्या परिसरात गहू लावण्यात आले, परंतु हे काम व्यवस्थीत करण्यात आल्याचे दिसून येत नाही. कारा अल्पावधी काळातच येथील गट्टू उघडे पडत आहेत. येथून दुचाकी नेताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तर रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
वॉटर फिल्टर मशीन गायब
प्रवाशांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे, याकरीता येथे वॉटर फिल्टर मशीन लावण्यात आली नाही. मात्र, आता तिथे वॉटर फिल्टर मशीन दिसून येत नाही. काही दिवसांतच ही मशिन काढून ठेवण्यात आली आहे. सद्यःस्थितीत प्रवाशांकरीता इतर कुठलीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, असे प्रवासीच बोलत आहेत.
click here