A very good comic as well as touching article on Railways in Maharashtra Times - those who can understand Marathi - Enjoy!! (/news/post/140425)
---
रेल्वेताई आज खूप रुसल्या . खरं तर रुसणं हा त्यांचा स्वभाव कधीच नव्हता . एखाद्याचं करायचं तर किती करावं हे रेल्वेताईकडून शिकावं असं म्हणायचे लोकं . लेकुरवाळी हो रेल्वे ताई अगदी . कुणाकुण्णाला म्हणून नाही म्हणाली नाही कधी ती . कुणी तिकीट काढा , कुणी नका काढू . सगळ्यांना सोबत घेऊन जाते . तिचा प्लॅटफॉर्म तर अनेकांचं हक्काचं घर . अनेक संसार तिथे बहरले , फुलले...
more... . तिचं जग म्हणजे गोकुळच जणू . कधी नव्हे ती आज रुसली . लोको पायलट गेले , समजावून आले . मेकॅनिक गेले , गार्ड गेले , टीसी गेले कुणालाच ऐकत नव्हती . सेल्फच घेत नव्हती . सुरूच होत नव्हती .
.
' बाई गं तू सुरू नाही झाली तर जमलेले सगळे प्रवाशी धिंगाणा करतील . मारतील आम्हाला . तोडफोड करतील , तुला कशाचा राग आला ते सांग , आम्ही तोडगा काढू .' एका लोकोपायलटने तिच्यासमोर आर्जव केलं .
.
' मी काय गोपीनाथ मुंडे आहे की अजित पवार . नाराज व्हायचं , रुसून बसायचं , हवं ते मिळालं की पुन्हा खूष व्हायचं . काय काय नाही केलं मी . कुठल्या घेऊन जाते मी सगळ्यांना . कुणाला इंटरव्ह्यूसाठी नेते . भेटीच्या ओढीने अस्वस्थ झालेल्यांना भेटवून देते . मोर्चासाठी नेते , देवदर्शनासाठी नेते , एकदा तरी इश्यू केला मी . तुम्ही एवढासा ओव्हरटाइम केला की त्याचा इश्यू करता . मोर्चे काढता , निवेदनं देता . मी कुणाला निवेदन देऊ ? जेव्हा सगळे शत्रू वाटू लागतात . जग आपल्या विरोधात दिसू लागतं . जगावं कशासाठी ? असा प्रश्न पडतो , तेव्हा माझ्याच पदराखाली येतात . रुळांचा आधार घेतात . कुणाचं तरी आयुष्य आपल्यामुळे संपलं याचं दूःख करावं की कुणाला तरी मुक्ती मिळाली याचं समाधान मानावं यात घालमेल होते माझी ... आजवर कधी बोलले नव्हते , आज बोलायला भाग पाडलं .' असं म्हणत रेल्वे ओक्साबोक्सी हुंदके देऊन लागली . इंजिनचा रिदम वाढू लागला . शिट्या हळूहळू वाजू लागल्या .
.
' अगंबाई झालं तरी काय ? कोण बोललं तुला , काही सांगशिल का ?'
.
' ती दुरंतो अन् ती शताब्दी नेहमीच मेल्या कसं तुसड्यासारखं वागवतात मला . काल परवा आल्या मेल्या , कानामागून येऊन तिखट झाल्या . यांचा वेग सांभाळण्यासाठी आम्हाला बाजुला उभं व्हावं लागतं . लोकं भराभर त्यांच्याचकडे पळतात . ह्याच होत्या का आजवर ? आता तर मेल्यांचं केवढं कौतुक सुरू झालं . त्यांच्यातून प्रवास करणाऱ्यांना म्हणे , पिझ्झा , बर्गर , पास्ता मिळणार आहे ... कशाला येईल कुणी आमच्याकडे .'
.
' अच्छा हे दु : ख आहे होय . कशाला काळजी करते बाई तू . पिझ्झा , बर्गर आलं म्हणून आईच्या हातची भाकरी अप्रिय झाली का कधी ? नूडल्स , मॅगी आल्या तरी पहिला घास तर चिऊचाच असतो ना . किती कॅटबरी आल्या तरी बेसणाच्या लाडूला पर्याय आहे का ? तो ओठावर ठेव तरं खरं कसा विरघळून जातो , एक वेगळीच गोडी देऊन जातो . जे जूनं ते जूनंच असतं , आपलं ते आपलंच असतं . बर्गर पिझ्झाच्या नशिबी कधी भाकरीचं प्रेम येणार नाही , तू निश्चिंत राहा , आणि आता शिट्टी वाजव ......!
.
- सर्किट